जळगाव प्रतिनिधी
वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या साठी भाजप जळगांव जिल्हा तर्फे ५ फेब्रुवारी २०२१ रोजी महावितरण विरोधात "टाळा ठोको" व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप जळगांव जिल्हा तर्फे देण्यात आला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी दिली.
राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा यासाठी 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला. या आंदोलनात जळगांव जिल्हातील 20 मंडलान मध्ये ही हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा पुढे म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपाचे कार्यकर्त ५ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तसेच वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील.
फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठिण आहे, असा सवालही जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी केला.
कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असा सवाल जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांनी राज्य सरकार ला केला.
या आंदोलनास जिल्हातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने आप आपल्या ठिकाणी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा यांनी केले आहे .
जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी

0 टिप्पण्या