नाथाभाऊं च्या हस्तेच धरणाचे शुभारंभ करू-जयंत पाटील

अंमळनेर प्रतिनिधी सत्तार खान

अमळनेर शहरप्रतिनिधी, येथील पाडळसरे धरणाच्या पाहणी दौरा सह कार्यकर्ता मेळाव्यास महाराष्ट्र राज्य चे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की,शेतकऱ्यांना येत्या काळात भाकरीत सुद्धा राष्ट्रवादी दिसेल म्हणून त्वरित धरणपूर्ती साठी अधिकचा निधी द्यावा,

नाथाभाऊ खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पाडळसरे धरण हे संपूर्ण अंमळनेर तालुक्यातच नव्हे तर इतर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कायम आहे. दुष्काळी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणारी जनता त्या कालखंडात आपण पाहिली आणि आता हे धरण शेतीसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्पआहे तरी आपल्या कालखंडात पूर्णत्वास न्यावा अशी माझी अपेक्षा,आहे,मी याधरणाचे भूमिपूजन केल,प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली पण दुर्दैवाने पुढच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे कमी होत गेले, याबाबत विचार करा आणि केंद्र सरकार कडे निधी साठी आपल्याला प्रयत्न करता येईल याचा विचार व्हावा,

या परिसंवादाला संबोधित करतांना जयंत पाटील यांनी सांगितले की,या भागात एक धरण बांधण्यासाठी माझ्या पक्षाचे विधानसभेचे सदस्य अनिल पाटील हे निवडणुकीला उभा राहिला पासून आग्रही राहिले आहे. अमळनेरला त्यांच्या प्रचाराला आम्ही सगळे आलो होतो, मोठ्या प्रमाणामध्ये या भागातले मतदार देखील उपस्थित होते


त्यावेळी मला आठवतय की मला अनिल भाईदास पाटील साहेबांनी माझ्या जवळ मागणी केली की मी उभा राहिलो आहे पण मला या धरणाच्या साठी मदत झाली पाहिजे त्यावेळी मी आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही आमदार द्या आम्ही तुम्हाला धरण पूर्ण करून देऊ, त्यावेळी आपले सरकार येईल आणि मी जलसंपदा मंत्री होईल असे वाटलं नव्हतं,धरणाचे डिझाईन करून घेणं आवश्यक होतं त्याप्रमाणे केलं त्याचा सगळा अहवाल प्राप्त होऊन त्यानंतर आता अंतिम चरणात ते डिझाईनिंग गेले एक महिन्यात आपल्याला प्राप्त झाल्यानंतर  अडीच वर्षात म्हणजेच तीन फायनान्शियल वर्षात धरण पूर्ण करू,सदर धरणाचे भूमिपूजन खडसे साहेबांनी आणि गोपीनाथरावजी मुंडे यांनी केले आहे तर मी सांगतो की,त्या धरणाचे उद्घाटन हे खडसे साहेबांच्या हाताने व उपस्थितीत होणार याची खात्री देतो,मात्र भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षात एक रुपया दिला नाही ,पाच वर्षात काही काम झालं नाही, म्हणजे 97- 98 मध्ये भूमिपूजन झालं आणि 14 वर्षात धोरणाला पुरेसे निधीं मिळाला नाही मात्र 2024 मध्ये धरण पूर्ण होणार याची पत्रकार बांधवांनी नोंद घ्यावी,त्यामुळे या तालुक्यांना फायदा होणार आहे हे धरण पूर्ण करणं ही इरिगेशन डेव्हलपमेंट कॉपोरेशन मधली प्रायोरिटी असेल, आता सुदैवाने तुमचे आमदार झाले आहेत,

महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते जिथे जिथे आहेत त्या सर्वांना भेट देण्याचे काम हे आजच्या या कार्यक्रमातून या उपक्रमातून आम्ही सुरू केले, लोक म्हणायला लागले की आता बहुतेक हे मध्यवर्ती निवडणूक करायचं दिसते पण तसं काहीही साहेबराव होणार नाही,आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष राहणार, माझी जबाबदारी होती की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन त्या त्या भागातल्या राष्ट्रवादी म्हणून जो काम करतो त्याला बघितलं पाहिजे चौकशी केली पाहिजे तर फार मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जात असताना मतदार संघ पवार साहेबांवर प्रेम करणारा आहे हे दिसून आले, मित्रांनो पक्ष हे आपलं साधं असतं विकासाचे आणि पक्षाच्या मार्फत विकास जर केला तर तो अधिक झपाट्याने सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाकडून होऊ शकतो,कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवणं हे अत्यंत गरजेचे आहे,बऱ्याच ठिकाणी चांगली उपस्थिती असते तर कुठे कमी असते, पक्षाच्या तालुका अध्यक्ष ,महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि त्यांच्या कमिटी आणि टीचर सेल आमचे या सगळ्यांनी त्यांना मिळालेली जबाबदारीही प्रभावीपणे काम करून पूर्ण केली पाहिजे, मतदारसंघातल्या सगळ्यांनी दर महिन्याला आपल्या अनुभवाचा एकमेकाला फायदा करून जी कामे शिल्लक असेल ती आपल्या आमदारांच्या माध्यमातून केले पाहिजे,जिथे आमदार नाही तिथं तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांनी लक्ष देऊन काम करावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे गरजेच आहे, आणि तो प्रभाव वाढवण्यासाठी आज खरं म्हणजे नाथाभाऊ आपल्या पक्षात आले आहेत त्याचा देखील आपल्याला फार चांगला फायदा होणार आहे, नाथाभाऊ यांच्या आगमनामुळे पक्षाला एक आणखी नवीन उपलब्धी झालेली आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा या जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे.

मंचावर राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते नाथाभाऊं खडसें, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, गुलाबराव देवकर आप्पा, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील , गफ्फार मलिक साहेब, माजी आमदार मनीष जैन, गुरुमुख जगवाणी, अभिषेक पाटील, विलास पाटील, कल्पना पाटील , संजय पवार, जयश्री पाटील ,रवींद्र पाटील, रोहन सोनवणे, योगेश देसले,सचिन पाटील, उमेश नेमाडे ,अरविंद मानकर, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

पाडळसरे धरण गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण स्थितीत राहत असल्याने स्थानिक राजकारण धरणा भवतीच फिरत आहे. धरण पूर्ण करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आश्वासने जनतेला दिली होती मात्र आजतागायत ते पूर्णत्वास गेले नाही. अमळनेर तालुक्यासह आजुबाजु च्या जिल्ह्यासह तालुक्यांना या धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे सदर धरण पूर्ण करावे अशी मागणी पाडळसरे धरण जन आंदोलन समिती निवेदन देऊन सदर बाब जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

तालुक्यातील दौरा दरम्यान येणाऱ्या बहुतांश गावात ढोलताशांच्या गजरात स्वागत करत पक्षाचे फलकांचे उद्घाटन करण्यात आले,  महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी मोर्चा च्या फलकाचे उद्घाटन ही जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची अतिष बाजी करून विद्यार्थ्याणीं जल्लोष केला.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या