चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील सुपुत्र सागर रामा धनगर वय 27 हे मणिपूरमधील सेनापती येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले ही घटना 31 रोजी पहाटे दोन वाजता घडली सागर धनगर हे नोव्हेंबर 2017 मध्ये 5 मराठा इन्फंट्री बटालियन मध्ये रुजू झाले होते सागर यांचे पार्थिव दिनांक 1 रोजी दुपारी दोन वाजता इम्फाळ मणिपूर येथून गुवाहाटी आसाम येथे आणण्यात येणार आहे तेथून ते मुंबई येथील विमानतळावर सायंकाळी 5:17 वाजता पोहोचेल त्यानंतर ते मंगळवारी 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे

0 टिप्पण्या